Monday, November 19, 2018

अर्धी लढाई जिंकली आहे

                                                                                                                                            17.11.2018

आज आम्ही दिवे  आगार फिरायला आलोय.  नील  चा स्वभाव  मुळात घाबरत  आहे,  जीवाला सांभाळून  राहणे कोणी त्याच्या कडून शिकव.  पावलं  भिजतील एवढयाच पाण्यात हा खेळणार.  हे सगळ मला  खुप निराश करत, म्हणुन मग आमच्यात थोडे वाद झाले आणि आणि आम्हीदोघे  एकमेकांशी  कट्टी करून बसलो.
रूमवर परत आल्यावर मी त्याला  सरळ बाथरूम  ,मध्ये घेऊन  चांगलाच  धूूऊन  काढला ( चांगल्या  अर्थाने बर का ) आणि  मग  मी कपडे पाण्यात  खळबळून काढत होते, सगळ बाथरूम, वाशबेसिन   रेतीमय झालं होत. हे सगळ बघून नील म्हणाला, "मुलींचं आयुष्य  किती कठीण आहे ना?  "  आशर्य चेहऱ्यावर न दाखवता ,कोणताही भाव  न बदलतात मी  विचारलं, "का बर अस  वाटते  तुला? " नील म्हणाला, "मुली किती काम करतात ना . भांडी  घासणे,  स्वयंपाक,  बाथरूम स्वच्छ ठेवणं,  हे सगळ तर तुम्ही मुलीच करता? " .  थोड्याच वेळापूर्वी ज्याच्यावर मी निराशा होते, त्याच्या कडे  बघून माझा उर अभिमानाने  भरून आला.  संधीचा  फायदा  घेत, मी विचारल की , "मग तू कही करू शकतोस का?"

मला आशार्यचा धक्का द्यायची एक ही संधी हा  मुलगा सोडत नहीं, "मम्मा मुलानी पण घरकामात मदत केली पाहिजे , भूख दोघांना लागते ,तर दोघांनी स्वयंपाक केला पाहिजे ,घरी सगळे रहता तर घर क्लीन सगळ्यानी केल पाहिजे,बाथरूम सगळे वापरतात ,तर ते क्लीन पण सगळ्यानीमिळून  केले पाहिजे." कुठल्या तरी मित्र मैत्रीणिशी बोलताना मीच हे बोलले होते. पण  आज हे सगळ, नील ने ऐकून लक्ष्यत ठेवल होत. त्याच्या तोंडून हे  ऐकताना मला एवढे समाधान मिळत होत ,ते शब्दात मांडण अवघडच आहे. 

मला कायमच मुलगा हवा होता, मुलगा मुलगी मध्ये मी चुकूनपण  भेदभाव करात नाही. पण लाडात  वाढवलेली माझी  मुलगी किंवा कुठलीच मुलगी जीला समान वागणूक मिळत नाही ,ते मला बघवणार नाही.स्रीला सर्वार्थाने समान वागणूक जर मिळावी अशी  इच्छा असेल तर कही गारुड मानवरून काढली पाहिजेत, अणि ज्यासाठी मनावर लहानपणापासून तसे संस्कार  झाले  पाहिजेत. मुलीच्या आईपेक्ष्य, मुलाच्या आईची जबाबदारी खुप मोठी आसते, असे  मला वाटत. अणि जर मुलांच्या आयानी हा शिवधनुष्य पेलला  तर संवेदनशील पीढ़ी तैयार होईल , मग हे so called women empowerment programs ची काहीच गरज पडणार नाही. 

नीलच बोलण ऐकून मी अर्धी लढाई जिंकली आहे आस वाटतय. पर  दिल्ली  अभी बोहोत दूर हैं

3 comments:

ak.shuklag said...

Bharich��

Vishal said...

Kya baat snehal... murti lahan kirti maan.. kiti lavkar mature zala ha :-O

S J said...

Thanks man ..kharach diwas khup fast Jat aahet